बरोबरही आणि चूकही...!

जगातल्या असंख्य प्रश्नांचे कारण काय असा जर विचार केला तर हे लक्षात येईल की कुटुंबातले मतभेद , जातीपाती मधले दुराग्रह , संस्कारातील कट्टरता आणि धर्मातले मतभेद ह्या सर्वांचे कारण ' माझेच बरोबर आणि दुसऱ्याचे चूक ' असे मानण्यामुळे आहे. ह्या ठेक्यावर चालल्यामुळे अनेक दुःखे निर्माण होतात. 
आपण आपला दृष्टीकोन बदलला तर मात्र ह्यावर तोडगा निघेल. तो रोजच्या जीवनात कसा बजावता येईल ह्याबद्दल पेठेकाकांचा लेख वाचा.

त्यांचा 'बरोबरही आणि चूकही...! ' हा लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.


पेठे काकांबद्दल 

डॉ. सुहास पेठे काका हे साताऱ्यातील आधुनिक दार्शनिक संत म्हणून ओळखले जातात. श्री ज्ञानेश्वर माऊलींपासून ते श्री जे. कृष्णमूर्ती यांच्यापर्यंत सर्व पंथांच्या उपासनेचे सार स्वतः आचरून सर्वसामान्य साधकांना सोप्या भाषेत सांगण्याचे असामान्य काम पेठे काकांचे आहे. प्रपंचात राहून परमार्थ कसा करायचा याचे उत्तम उदाहरण म्हणजे पेठेकाका. चोवीस वर्षे स्टेट बँकेत नोकरी करून २००१ मध्ये काकांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन उपासना व्यापक प्रमाणात चालू केली. 
त्यांचे वेगवेगळे उपक्रम जसे मौनमाळ, नाम शिबिरेप्रश्नोत्तरसत्रेपदयात्राहरिजागरआत्मपरीक्षण शिबिरेमुलांची शिबिरेचिंतनसत्रचर्चा भेटी हे गेले अनेक वर्षे चालू आहेत. त्यांच्या जवळ जवळ १०० च्या वर पुस्तकांचे तसेच १२५ च्या वर व्हिडीओ  सीडींचे प्रकाशन झाले आहे.

No comments:

Post a Comment